काेराेनाची तिसरी लाट ऑक्टाेबरच्या मध्यावर सुरु हाेण्याची शक्यता ...

मुंबई: काेराेनाची दुसरी लाट सध्या ओसरत चालली आहे. राज्यासह मुंबईत रुग्णसंख्याही घटत असल्याचे समाेर येत आहे. याशिवाय काही दिवसांपासून राज्य सरकारने काेराेना निर्बंधही शिथिल केले आहेत काही दिवसांवर गणेशाेत्सव येवून ठेपला असल्याने खरेदीसाठी नागरिकांची बाजारात झुंबड हाेत असल्याचेही चित्र दिसून येत आहे.
अशी स्थिती असताना, संभाव्य काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञ डाॅक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. सद्य स्थिती पाहता, मे महिन्यापासून हळू हळू रुग्णसंख्या कमी हाेऊ लागली आणि जुलैच्या अखेरीस ४ हजाराच्या घरात गेली. पण गेले सव्वा महिना रुग्णसंख्या ४ ते ५ हजारांच्या घरात आहे. ही दुसरी लाट संपायला आणखीन महिना ते दिड महिना लागण्याची शक्यता आहे. यामुळे तिसरी लाट ऑक्टाेबरच्या मध्यावर सुरु हाेईल असा अंदाज तज्ज्ञ डाॅक्टर व्यक्त करत अाहेत.
विषाणूच्या महामारात नवी लाट येण्यापूर्वी काही अंतस्थ व बाह्य कारणे दिसून येतात
- आधीची लाट अाेसरत जाणे पण पूर्ण नाहीशी न हाेणे - आजमितीला महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. . दुसरी लाट कमी हाेत चालली आहे. पण कराेना बाधितांची संख्या राेज ४ ते ५ हजारांनी वाढतेच आहे. त्यामुळे काही काळाने तिसरी लाट येणार हे नक्कीच
- विषाणूंचा नवा प्रकार- राज्यात पहिल्या लाटेला मूळचा साेर्स-काेव्ही-२ हा विषाणू कारणीभूत हाेता. दुसऱ्या लाटेसाठी त्याचा नवा प्रकार बी.१.६१७.२’ म्हणजेच डेल्टा व्हेरियंट. हा डेल्टा जगात प्रथम महाराष्ट्रात अमरावतीमध्ये मिळाला आणि अाता या डेल्टामध्येही म्युटेशन हाेवून तयार झालेला डेल्टा प्लस. एवाय.१,एवाय.२आणि एवाय.३ असे त्याचे तीन उपप्रकारही सापडलेत आणि नुकत्याच झालेल्या नमुना चाचण्यांमध्ये हा विषाणू महाराष्ट्रासह १२ राज्यात सापडलाय आणि महाराष्ट्रातल्या १०.१२ जिल्ह्यात याच्या जून २०२१ पर्यंत ६५ केसेस सापडल्यात. हा डेल्टा प्लस अाता कदाचित कमी प्रमाणात असेल, पण काही दिवसात त्याचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे सांगण्यात येत अाहे. हा डेल्टा प्लसच महाराष्ट्रात तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल आणि लसीना दाद देत नसल्याने माेठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात अाहे. दिवसाला एक ते दिड लाखांपर्यंत रुग्णसंख्या वाढेल अशी चिन्ह दिसत असल्याचे तज्ज्ञ डाॅक्टर सांगतात. काेराेनाच्या नियमांची पालमल्ली ही हाेत असल्याचे मागील काही महिन्यांपासून वारंवारं दिसून येत आहे. , ही बाब ही तिसरी लाट येण्यास कारणीभूत ठरेल असेही वरिष्ठ डाॅक्टर सांगतात.
- टेस्टींग, आयसाेलेटिंग व ट्रीटिंग या तिन्ही बाबतीतही सरकारकडून खूप अांधळा कारभार सुरु असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.
-टेस्टिंग : काेराेनाच्या सुरुवातीपासून अाजपावेताे टेस्टिंग पुरेसे हाेत नाहीये. साधारणत: एक पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला तर त्याचा २० पट टेिस्टंग हवे. पण महाराष्ट्र राज्याच्या बहुसंख्य जिल्ह्यांमद्ये ते २ पटीपेक्षा जास्त नसते. मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमध्ये जिथे दाेन्ही लाटांच्या काळात हाहा:कार माजला हाेता. त्यावेळेसही जेमतेम ५ ते८ पटीने चाचण्या हाेत हाेत्या. मे २०२१ पासून तर हे प्रमाण अाणखीनच घसरले असल्याचे मत वरिष्ठ डाॅक्टरांनी व्यक्त केले अाहे. रुग्णांसाठी साेयी सुविधा असणे अावश्यक अाहे त्यावरही राज्य सरकारने भर द्यावी असेही मत व्यक्त केले आहे.
-मंदावलेले लसीकरण: १६ जानेवारीपासून लसीकरण माेहिम सुरु करण्यात अाली अाहे. राज्याच्या तेरा काटी जनतेपैकी ४ काेटी ३० लाख लाेकांचा म्हणजे साधारणत: ३३ टक्के जनतेचा १ डाेस झालाय तर केवळ एक काेटी साठ लाख नागरिकांचे म्हणजे १२.३ टक्के लाेकांचे दाेन्ही डाेस झालेले आहेत . काेराेनाच्या तिसऱ्या लाटेत ज्याचे अजिबात लसीकरण झालेले नाही अशांना माेठा प्रमाणात लागण हाेण्याची शक्यता आहे.. साहजिकच क़िमान ८ काेटी नागरिकांपैकी अनेकजण या लाटेची संक्रमित हाेण्याची शक्यता आहे. . यात तीन काेटी १८ वर्षाखालील लहान मुले आहेत. त्यांच्याकरीत अजूनही लसीकरण उपलब्ध नसल्याने त्यांची या लाटेत परवड हाेण्याची संभावना आहे.
....
ऑक्टाेबर अखेरीस काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून सर्वसामान्य नागरिक राजकीय नेते नियम पालनाबाबत कुचराई करत असल्याने ती वेगाने वाढण्याची शक्यता अाहे. प्रशासनाच्या ढिलाईमुळे व लसीकरणाच्या अभावामुळे तिची व्याप्ती खूप जास्त असण्याची शक्यता अाहे. शिवाय दुसऱ्या लाटेपेक्षा ती दीर्घकाळ टिकू शकत. यामुळे सरकारी उपचार, लसीकरण आणि नियमांचे पालन करणे गरजेचे अाहे, या बाबीकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
डाॅ. अविनाश भाेंडवे (माजी अध्यक्ष आयएमए, महाराष्ट्र राज्य)